उजनी धरण फुल नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा भीमा नदीत एक लाख 25 हजार विसर्ग महापूर येणार पंढरपूर मंगळवेढा गावांना धोक्याचा इशारा

उजनी धरण फुल नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा भीमा नदीत एक लाख 25 हजार विसर्ग भीमा नदीला महापूर येणार पंढरपूर मंगळवेढा गावांना धोक्याचा इशारा
टेंभुर्णी (प्रतिनिधी)
- भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून उजनी धरण जलाशय आज दिनांक 4 ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 10 वाजता 86 % टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये आज सायंकाळी 5 वाजता 20000 क्यूसेक्स ने सुरुवातीला पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. विसर्गा मध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.
तरी भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांना याद्वारे सुचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे उजनी धरण पूर्ण नियंत्रण कक्षाने केले आहे
भीमा नदीला मोठा महापूर येणार.
पंढरपूर मंगळवेढा आदी शहरे व नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे
आज रविवार चार ऑगस्ट रोजी दुपारपासून उजनी धरणात दौंड येथून 90 हजार क्यूसेक्स विसर्गाने पाणी होणार आहे, तसेच वीर धरणा मधून नीरा नदीत 65 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सात पर्यंत नरसिंहपूर येथील निराभिमासंगमापासून भीमा नदीत प्रभावी होणार आहे. त्याचप्रमाणे उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात सातत्याने वाढ होत असल्यामुळे आज ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता धरणातून भीमा नदीत प्रथम वीस हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे, यानंतर धरणात येणारा विसर्ग वाढत असल्यामुळे मध्यरात्री 12 पर्यंत उजनीतून भीमा नदीत किमान 50 ते 70 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे, या सर्व परिस्थितीमुळे नरसिंहपुर पासून भीमा नदीत पाच ऑगस्ट च्या पहाटेपासून १ लाख 25 हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त विसर्गाने भीमा नदीत पाणी प्रवाही होत असल्यामुळे भीमा नदीला मोठा महापूर येणार आहे. चार ऑगस्ट मध्यरात्रीपासून हळूहळू प्रमाणात नदीचे पाणी वाढणार असल्यामुळे पाच ऑगस्ट च्या सकाळपासून पंढरपूर, मंगळवेढा आदी शहरासहित नदीकाठच्या सर्व गावांना धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे सुरक्षित ठिकाणी जावे असे प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे..