solapur

गणेशगांव येथील फुटलेल्या बंधाऱ्याचे काम तात्काळ चालू करावे यासाठी युवा सेनेचे अन्नत्याग आंदोलन

गणेशगांव येथील फुटलेल्या बंधाऱ्याचे काम तात्काळ चालू करावे यासाठी युवा सेनेचे अन्नत्याग आंदोलन.

संचार वृत्त अपडेट 

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हा २०२२ च्या पुरामध्ये वाहून गेला होता.त्या बंधाऱ्याचे काम आजतागायत केले नाही. युवा सेनेच्या वतीने या बंधाऱ्यावर्ती नोव्हेंबर २०२४ पासून हालगी नाद आंदोलन,जल समाधी आंदोलन,पाटबंधारे खात्याच्या विरोधात मुंडणं आंदोलन असे अनेक प्रकारची आंदोलने केली तेंव्हा कुठे तरी पाटबंधारे खात्याने या बंधाऱ्याचे दुरुस्तीचे टेंडर काढले.

या टेंडरची ई निविदेची तारीख २० मार्च २०२५ ते ३ एप्रिल २०२५ ठेवली आणी ई निविदा उघडण्याची तारीख ७ एप्रिल ठेवली होती. परंतु ई निविदा उघडून ही आज दिड महिना झाला.तरीही बंधाऱ्याचे काम अजूनही चालू झाले नाही.हे काम तात्काळ चालू करावे या मागणीसाठी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व माळशिरस तालुका मराठा सेवक आशुभाऊ ढवळे यांनी गणेशगांव येथील निरा नदीच्या बंधा-यावर अन्नत्याग आंदोलन चालू केले आहे.जोपर्यंत या बंधाऱ्याचे काम चालू होत नाही.तो पर्यंत अन्नत्याग चालूच राहील.
यावेळी गणेशगांवचे सरपंच नजीर शेख,माजी सरपंच दादासाहेब नलवडे,पोपट रुपनवर,पोलीस पाटील भाईसाब शेख,मनोहर यादव अप्पासाहेब महाडिक, अप्पासाहेब शेंडगे,माऊली मदने गणेश यादव,अमीर कोरबू,बालम कोरबू,सागर मोरे,ओंकार पाटील,हारून कोरबू,शब्बीर शेख,विजय यादव,सैफुल शेख, गणेश जाधव,हुमाईन शेख,अमीर शेख,सागर मोहिते,नसीर शेख इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button