मराठा आंदोलकासाठी तांदुळवाडीतून फळे वाटप

मराठा आंदोलकासाठी तांदुळवाडीतून फळे वाटप
ग्रामीण भागातून आंदोलनाला सामाजिक पाठबळ ; नामदेव मिले
संचार वृत्त अपडेट
ग्रामीण भागातून मिळणारी मदत ही केवळ भौतिक स्वरूपातली नसून ती या आंदोलनाला मिळणाऱ्या सामाजिक बडाचे साक्ष आहे मुंबईतल्या आंदोलन स्थळी संख्या वाढत असून गावोगावातून मिळणाऱ्या मदतीमुळे त्यांचा उत्साह अधिक दुणावलेला आहे आपण उपाशी राहू देणार नाही अशी हाक ग्रामीण भागातील जनतेतून येत आहे अशी माहिती नामदेव मिले व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

मुंबई येथील आझाद मैदान येथे माळशिरस तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलनात सहभागी झाला आहे त्याच्या खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून तांदळवाडी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन पेरू काकडी सिताफळ केळी ई फळांचे वाटप करण्यात आल्याचे नामदेव मिले यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन जोपर्यंत मुंबईमध्ये सुरू राहील तोपर्यंत मराठा आंदोलकांना खाण्यापिरांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामीण भागातून अनेक संघटना आणि राज्यातील तळागाळातील समाज घटकांनी त्यांना अन्न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.



