solapur

माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश देण्याची रिपाइंची मागणी

माळशिरस तालुक्यातील विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश देण्याची रिपाइंची मागणी

संचार वृत्त अपडेट 

माळशिरस तालुक्यातील विविध गावातील वाडी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता गणवेश व पुस्तके अद्यापपर्यंत उपलब्ध झालेली नाहीत. अशा तक्रारी नागरिकांकडून आम्हाला मिळत असून यापूर्वीच आपणाशी भ्रमणध्वनी वरून आंम्ही चर्चा केली.मात्र, तरीसुद्धा अनेक ठिकाणी या गैरसोयी अजून पूर्ण झाल्या नाहीत. तसेच मौजे वेळापूर एस.टी.स्टँड समोरील, जि.प.शाळेचे कंपाउंड वॉल बांधकाम करायचे राहून गेल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींना तेथून, रस्त्याने ये-जा करणा-या नागरिकांमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून, आपण जर दि.०९ / ०७/ २०२५ पर्यंत सदरच्या गैरसोयी तात्काळ दूर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ प्रमाणे सर्व सोयी परिपूर्णपणे उपलब्ध न केल्यास आपल्या प्रशासनाचा निषेध म्हणून आपल्या पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्यासमोर दि.१० /०७ /२०२५ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,आठवले गट, यांच्यावतीने आंम्ही तीव्र प्रकारची निदर्शने करणार आहोत.असा इशारा यावेळी, शिक्षण विभागात लेखी निवेदन देऊन,मिलिंद सरतापे यांनी दिला.
यावेळी जिल्हा सचिव रमेश धाईंजे,तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर,तालुका उपाध्यक्ष संजय भोसले,तालुका उपाध्यक्ष सुनील ओवाळ कुसमोड शाखाध्यक्ष राहुल सातपुते,माळशिरसचे युवा नेतृत्व, शरद धाईंजे,महेश चव्हाण इत्यादी यावेळी उपस्थित होते.

गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये,अनेक गावातील जि.प.च्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फेब्रुवारी,मार्चपर्यंत गणवेश मिळाले नव्हते. अशी घटना या वर्षी घडली तर,सदर शालेय व्यवस्थापन समितीवर कारवाई

होण्यासाठी,मा‌.जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांचे कार्यालयावरती आंदोलन करणार असल्याचे यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button